मंगलवार, 20 फ़रवरी 2018

👉 लिंबूपाणी पिण्याचे घरगुती उपाय व फायदे असेही आहेत!

लिंबूपाण्याचे असेही फायदे व घरगुती उपाय!

         

     लिंबू हे फळ नेहमी आपल्या स्वयंपाक घरात सर्रास वापरले जाते. आता उन्हाळा हळू हळू वाढत असताना लिंबू पाणी सेवन करणे फायद्याचे ठरते. लिंबू पाणी आपल्या शरीरात ऊर्जा प्रदान करते त्यामुळे ते नेहमीच उपयोगी ठरते असेच काही घरगुती उपाय व फायदे आपण आता जाणून घेऊया.


१)वजन कमी करणे.  

            जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही हा सोप्पा घरगुती उपाय करून पहा. उपाय असा आहे की रोज सकाळी कोमट पाण्यामधील लिंबू सरबत सेवन करा त्यासाठी कोमट पाण्याच्या एका ग्लास मध्ये लिंबाचा रस घालून ते किमान २ वेळा सेवन करावे. प्रत्येक तासाला एक एक ग्लास पाणी प्या यामुळे भूक कमी लागेल आणि शरीराचे संतुलन राखले जाते. ह्या क्रियेमुळे पचन तंत्र सुधारते.


२) पोटाचे विकार दूर होतात

           जर तुम्हाला काही पोटाचे विकार असतील तर हे नक्की करून पहा. रोज लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पचन क्रिया सुधारते व पोटाचे विकार दूर होतात. पचन क्रिये बरोबरच ऍसिडिटी चा त्रासही होत नाही त्यामुळे पोट खराब असलंयास लिंबूसरबत फायद्याचे ठरते.


३) किडनी स्टोन च्या आजारावर फायदेशीर

            रोज लिंबूसरबत घेतल्याने आरोग्य सुधारते त्याचबरोबर मुतखडा होणे हे विकार हि दूर होतात.लिंबूसरबतामुळे शरीर हायट्रेड होण्यास मदत होते. त्यामुळे युरिन ब्लॉक होणे हा त्रास कमी होतो .


४)मधुमेहावर गुणकारी.

          साखरेचे प्रमाण असलेले पेय याचे सेवन करण्यापेक्षा लिंबू सरबतचे सेवन करणे कधीही फायद्याचे. लिंबूसरबतामुळे  रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहते. शरीर हायट्रेड राहते व शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.


       तर हे होते लिंबूपाणी पिण्याचे फायदे व घरगुती उपाय. लेख आवडल्यास नक्की share करा व हि माहिती आपल्या प्रियजनांना सांगा.

शुक्रवार, 2 फ़रवरी 2018

👉काय आहे बजेट 2018? जाणून घ्या!

💰 बजेट 2018 


▫ इन्कम टॅक्स रचनेत कोणताही बदल नाही, अडीच लाख रुपये उत्पन्न करमुक्तच राहणार

▫ ज्येष्ठ नागरिकांना 50 हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज

▫ मोबाइलवरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांवरून वाढवून केली 20 टक्के, मोबाइल खरेदी महागणार

▫ राष्ट्रपतींचा पगार 5 लाख, उपराष्ट्रपतींचा पगार 4 लाख तर राज्यपालांचा पगार 3 लाख रूपये

▫ खासदारांचा पगार एप्रिल 2018मध्ये वाढणार, दर पाच वर्षांनी महागाई दराप्रमाणे पगार वाढेल

▫ पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 1 कोटी पेक्षा जास्त घरे बांधली जात आहेत

▫ प्रधानमंत्री सौभाग्य योजनेतून 4 कोटी घरांना मोफत वीज कनेक्शन देण्याची योजना

▫ कृषी उत्पादन तयार करणाऱ्या 100 कोटींचं उत्पन्न असणाऱ्या कंपन्यांना टॅक्समध्ये 100 टक्के सवलत

▫ कृषी उत्पादक कंपन्या पहिल्या पाच वर्षांसाठी 100 टक्के करमुक्त

▫ क्रिप्टोकरन्सीला सरकार कायदेशीर समजत नाही

▫ रोखीने टोल देण्याची सिस्टम डिजिटल करणार

▫ मुद्रा योजनेमध्ये 76 टक्के लाभधारक महिला असून, 50 टक्के एससी, एसटी आणि ओबीसी आहेत, 3 लाख रुपये कर्ज वाटपाचे लक्ष्य

▫ स्टार्ट अप आणि उद्योग विकासासाठी मोदी सरकारचा नवा प्लान, नोटबंदीनंतर उद्योगांचं नुकसान भरून काढण्यासाठी लघुउद्योगांसाठी 3 हजार 700 कोटींची तरतूद

▫ नव्या कर्मचाऱ्यांना ईपीएफमध्ये सरकार 12 टक्के रक्कम देणार

▫ सर्व क्षेत्रातील नवीन कर्मचाऱ्यांचा 12 टक्के पीएफ सरकार भरणार

▫ महिला कर्मचाऱ्यांचा ईपीएफ 8 टक्के करण्याची शिफारस

▫ प्राईम मिनिस्टर फेलोशिप योजनेतून 1000 बी.टेक विद्यार्थ्यांची निवड होणार

▫ 10 कोटी गरीब कुटुंबांसाठी राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना आणत आहोत, त्याचा 50 कोटी लोकांना लाभ मिळणार

▫ आदिवासी मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी 'एकलव्य स्कूल' उभारणार

▫ नॅशनल हेल्थ पॉलिसी अंतर्गत येणारी 1.5 लाख सेंटर्स लोकांच्या घराजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न, हे सेंटर्स मोफत तपासणी आणि औषधं देणार, 12 हजार कोटी यासाठी मंजूर

▫ नमामी गंगा कार्यक्रमातंर्गत नदी स्वच्छतेच्या 187 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, 16173 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

▫ टीबी रोखण्यासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद

▫ 24 नवी मेडिकल कॉलेज देशभर उभारणार, 3 लोकसभा मतदान संघाच्या मागे एक मोठं हॉस्पिटल उभारणार

▫ राष्ट्रीय स्वास्थ विमा' योजना 1200 कोटी रूपये खर्च करून देशभर उभारणार

▫ प्रत्येक राज्यामध्ये किमान एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय असेल

▫ आरोग्यसुविधा सुधारण्यासाठी 'आयुषमान भारत' कार्यक्रम राबविण्याचा निर्णय

▫ आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, एका टक्क्याची वाढ 

▫ शिक्षण आणि आरोग्यावरील सेस दर एका टक्क्यानं वाढणार

▫ शेअर बाजरातील शेअर्सच्या विक्री व्यवहारावर कर भरावा लागणार

▫ यावर्षी 8.27 कोटी लोकांनी कर भरला, गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 लाख लोकांची वाढ

▫ 1 लाख ग्राम पंचायती ऑप्टीक फायबरने जोडण्याचे काम पूर्ण, ग्रामीण भागात 5 लाख वायफाय स्पॉट बनवण्यात आले आहेत

▫ तीन सरकारी विमा कंपन्यांचे विलिनीकरण करुन एकच कंपनी बनवणार

▫ सध्या 124 विमानतळे सेवेत, कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी उडान योजनेला बळ

▫ विमानतळांची संख्या 5 टक्क्यांनी वाढवणार, 900 नव्या विमानांची खरेदी करणार

▫ 25 हजारापेक्षा जास्त फुटबॉल असणाऱ्या रेल्वे स्थानकांवर एक्सलेटर बसवण्यात येणार, सर्व रेल्वे स्थानक आणि ट्रेनमध्ये वायफाय आणि सीसीटीव्ही बसवण्यात येणार 

▫ 11 हजार कोटी रूपये खर्चून मुंबईत 90 किमीच्या रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाचं काम सुरू

▫ 18 हजार किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण करण्याचं काम हाती, 3600 किमीचे ट्रॅक नव्याने बांधण्याचं काम हाती

▫ आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी 1.38 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे, चालू आर्थिक वर्षात 1.22 लाख कोटींची तरतूद होती.

▫ रेल्वे सेवेच्या विकासासाठी वर्षात 1 लाख 48 हजार कोटींचा निधी खर्च करणार

▫ 600 रेल्वेस्थानकांचा विकास सुरु, विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार

▫ 9 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं सरकारचं लक्ष्य

▫ अमृत योजनेअंतर्गत 500 शहरांना शुद्ध पिण्याचं पाणी पोहचविण्याचे लक्ष्य

▫ 56 हजार कोटींचा निधी अनुसुचित जातींच्या विकासासाठी मंजूर तर अनुसुचित जमातींच्या विकासासाठी 39,135 कोटी रूपयांना निधी मंजूर

▫ यंदाच्या वर्षात 70 लाख रोजगार निर्मिती झाल्याचे स्वतंत्र सर्वेक्षणातून समोर

▫ प्री-नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचं धोरण एकच राहील याची काळजी घेणार

▫ शिक्षकांचा दर्जा सुधारला तर शिक्षणाचाही दर्जा सुधारेल, शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्याकडे भर, 13 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम, डिजिटल शिक्षण देण्याची योजना

गुरुवार, 1 फ़रवरी 2018

👉चष्म्याचा नंबर कमी करायचाय? मग हे करून पहा !

  👉चष्म्याचा नंबर कमी करायचाय? मग हे करून पहा !

         कमी वयात चष्मा लागणे हि काहींसाठी नक्कीच खेदाची गोष्ट असते आणि त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यामुळे काहींचा चष्मा जातो पण काहींना मात्र ही समस्या त्रास देत राहते. 
        अयोग्य आहार ,वाढणारे वय किंवा डोळ्यांवर येणार तणाव , सतत मोबाईल वापर इत्यादी कारणांनी चष्मा लागतो. परंतु जर अगदी सहज सोप्या पद्धतीने चष्म्याचा नंबर टाळता आला किंवा कमी करता आला तर किती छान! 





चष्मा लागण्याची कारणे

१) अयोग्य आहाराच्या सवयी, वाढते वय
२)डोळ्यांवर येणार तणाव (अति प्रकाश यामुळे)
३)अनुवांशिक 
४)डोळ्यांची निगा न राखणे.


चष्मा कमी करण्यासाठीचा व्यायाम

१)
दिवसातील काही काळ सूर्यप्रकाशात घालवावा. काही वेळ डोळे बंद करून सूर्यप्रकाशकडे पाहत उभे राहावे.

२)
दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून गरम करून ते बंद डोळ्यावर ठेवावे. हाताने डोळे पूर्ण झाकून घ्यावे व हि क्रिया दिवसातून ५-६ वेळा किंवा जमेल तेव्हा करावी.

३)
नेहमी रात्री ४-५ बदाम पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी साल काढून गरम दुधातून सेवन करावे त्यामुळे नजर चांगली राहते.

४)
एक पेन डोळ्यासमोर एक हात दूर अंतरावर ठेवावी व एकटक पाहत राहावे. हळूहळू नाक पेनाच्या जवळ न्यावे.जसजसा पेन जवळ येईल तसे नजर केंद्रित होणे कमी होईल. हा व्यायाम दिवसातून १०-१५ वेळा करावा.

५)
डोळा घड्यालाच्या दिशेने किंवा उलट्या दिशेने ६-७ वेळा फिरवावे.

तर हे नक्की करून पहा आवडल्यास नक्की आपल्या प्रियजनांसोबत share 👍 व आमच्या fb पेजला पण like करा😊