गुरुवार, 27 दिसंबर 2018

माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे ?

'माझी कन्या भाग्यश्री योजना ' आहे तरी काय?



👉 योजनेचा लाभ कोणाला घेता येतो?


१) ज्या परिवारात पहिले व दुसरे अपत्य कन्या अपत्य असेल आणि ज्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे सात लाख पन्नास हजार (७.५० लाख ) रुपये एवढे असेल अश्या परिवारास या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
२) हा लाभ फक्त कन्या अपत्य म्हणजे मुली असलेल्या परिवारास घेता येऊ शकतो.
३)या योजनेच्या पात्रतेसाठी सदर परिवार हा मूळ रुपात महाराष्ट्राचा नागरिक असावा म्हणजेच महाराष्ट्र domacile असावा.
४)या योजनेचा लाभ फक्त एकूण २ मुली अपत्यां पुरता मर्यादित आहे.

तिसरे अपत्य 👧मुलगी किंवा  👦मुलगा काहीही झाले तर या योजनेचा लाभ सरकार रद्द करते.



👉👉योजनेचा हेतू :-


--- माझी कन्या भाग्यश्री हि योजना महाराष्ट्र सरकार तर्फे राबवण्यात येते.
--- गरीब मुलींना चांगले शिक्षण घेता यावे तसेच राज्यात स्त्री पुरुष लिंगदर याचा समतोल राखने, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी हि योजना राबवली जाते.



👉 या योजनेचे फायदे:-


१) ज्या परिवारात एका किंवा २ मुलींच्या जन्मानंतर परिवार नियोजन (नसबंदीचे ओपरेशन) केले असेल त्या परिवारास या योजनेचा लाभ घेता येतो.
२) या योजनेनुसार जर एक कन्या असेल तर सरकार तिच्या नावे ५०,००० रुपये तर २ कन्या असतील तर प्रत्येकी २५००० रुपये मुलीच्या नावे बँक खात्यामध्ये जमा केले जातात.
३) त्या मुलीचे वय वर्ष ६ आणि १२ वर्ष झाल्यावर त्या रकमेचे व्याज काढता येते. उर्वरित बाकीची सर्व रक्कम व व्याज मुलीचे वय १८ नंतरच वापरता येते. या दरम्यान जर तिसरे अपत्य जन्माला आले तर सरकार ह्या योजनेचे लाभ लगेच रद्द करते.



📃अर्जाचा नमुना:-


१)

२)

३)


 ४)

तरी वरील अर्ज व इतर माहिती pdf स्वरूपात download करण्यासाठी येथे 📲 क्लिक करा.



धन्यवाद 🙏
माहिती आवडल्यास नक्की share करा व आमच्या फेसबुक page ला पण like करा व असेच नवीन updates मिळवा 🙏

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें