👉 शरीराला आवश्यक असणारे 'अन्नघटक'!
अनेकदा धावपळीत आपले आहाराकडे दुर्लक्ष होते. यामुळे शरीराला पुरेसे अन्न घटक मिळत नाहीत व परिणामी शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही. म्हणूनच शरीराला कोणते अन्नघटक आवश्यक असतात. त्याचा शरीराला काय फायदा होतो किंवा त्याच्या कमतरतेचे तोटे काय? याविषयी आज जाणून घेणार आहोत...
👉 कॅल्शियम
● कोणत्या पदार्थातून मिळते -
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, ज्वारी, राजगिरा यांमध्ये कॅल्शियम असते. याबरोबरच खरबूज, खजूर आणि मुळा, कोबी या भाज्यांमध्येही कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असते.
● अभावामुळे उद्भवणारे परिणाम -
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
● शरीराला उपयोग काय -
कॅल्शियम हे शरीरातील सर्वात मुख्य खनिज असून ते हाडांच्या बळकटीसाठी आणि शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असते.
👉 लोह
● कोणत्या पदार्थातून मिळते -
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी या पदार्थामधून लोह मिळते.
● अभावामुळे उद्भवणारे परिणाम -
महिलांमध्ये साधारणत: लोहाची कमतरता असल्याने त्यांना विविध तक्रारींचा सामना करावा लागतो. तसेच लोहाची कमतरता झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
● शरीराला उपयोग काय -
शरीराची योग्य पद्धतीने वाढ व्हावी यासाठी हा घटक अत्यावश्यक असतो.
👉 आयोडिन
● कोणत्या पदार्थातून मिळते -
शिंगाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण या पदार्थांमध्ये आयोडिन असते.
● अभावामुळे उद्भवणारे परिणाम -
याची कमतरता असलेल्यांना थायरॉइडची समस्या, केस गळणे, नैराश्य किंवा बैचेनी असे त्रास उद्भवू शकतात.
● शरीराला उपयोग काय -
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूचा बचाव करण्याचे काम आयोडिनव्दारे केले जाते.
👉मॅग्नेशियम
● कोणत्या पदार्थातून मिळते -
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं या पदार्थांमध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असते.
● अभावामुळे उद्भवणारे परिणाम -
मॅग्नेशियमची कमतरता असेल तर उदास होणे, आळस येणे, ताण येणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोड येणे, नपुंसकता किंवा वांझपणा अशा तक्रारी उद्भवतात.
● शरीराला उपयोग काय -
मॅग्नेशियममुळे पेशीचे कार्य सुधारते आणि ते शरीरातील रेचक म्हणून काम करते.
अनेकदा धावपळीत आपले आहाराकडे दुर्लक्ष होते. यामुळे शरीराला पुरेसे अन्न घटक मिळत नाहीत व परिणामी शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही. म्हणूनच शरीराला कोणते अन्नघटक आवश्यक असतात. त्याचा शरीराला काय फायदा होतो किंवा त्याच्या कमतरतेचे तोटे काय? याविषयी आज जाणून घेणार आहोत...
👉 कॅल्शियम
● कोणत्या पदार्थातून मिळते -
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, ज्वारी, राजगिरा यांमध्ये कॅल्शियम असते. याबरोबरच खरबूज, खजूर आणि मुळा, कोबी या भाज्यांमध्येही कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असते.
● अभावामुळे उद्भवणारे परिणाम -
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
● शरीराला उपयोग काय -
कॅल्शियम हे शरीरातील सर्वात मुख्य खनिज असून ते हाडांच्या बळकटीसाठी आणि शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असते.
👉 लोह
● कोणत्या पदार्थातून मिळते -
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी या पदार्थामधून लोह मिळते.
● अभावामुळे उद्भवणारे परिणाम -
महिलांमध्ये साधारणत: लोहाची कमतरता असल्याने त्यांना विविध तक्रारींचा सामना करावा लागतो. तसेच लोहाची कमतरता झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
● शरीराला उपयोग काय -
शरीराची योग्य पद्धतीने वाढ व्हावी यासाठी हा घटक अत्यावश्यक असतो.
👉 आयोडिन
● कोणत्या पदार्थातून मिळते -
शिंगाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण या पदार्थांमध्ये आयोडिन असते.
● अभावामुळे उद्भवणारे परिणाम -
याची कमतरता असलेल्यांना थायरॉइडची समस्या, केस गळणे, नैराश्य किंवा बैचेनी असे त्रास उद्भवू शकतात.
● शरीराला उपयोग काय -
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूचा बचाव करण्याचे काम आयोडिनव्दारे केले जाते.
👉मॅग्नेशियम
● कोणत्या पदार्थातून मिळते -
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं या पदार्थांमध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असते.
● अभावामुळे उद्भवणारे परिणाम -
मॅग्नेशियमची कमतरता असेल तर उदास होणे, आळस येणे, ताण येणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोड येणे, नपुंसकता किंवा वांझपणा अशा तक्रारी उद्भवतात.
● शरीराला उपयोग काय -
मॅग्नेशियममुळे पेशीचे कार्य सुधारते आणि ते शरीरातील रेचक म्हणून काम करते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें