👉 सतीश मगर ; 150 शेतकरी कुटुंबाला करोडपती बनविणारा अवलिया
पुण्यातील मगरपट्टा सिटीबद्दल कोणी ऐकलं नसेल तर नवलच. अशा या मगरपट्टा सिटीला पुण्याचं नवीन आकर्षण म्हंटल तर काही वावगं ठरणार नाही. रजनीकांतला सुद्धा याची भुरळ पडली आणि शिवाजी द बॉस या चित्रपटाचे काही शूटिंग मगरपट्टा सिटीत चित्रित केले.
अशी हि प्रसिद्ध टाऊनशिप कोणत्या व्यावसायिकाची असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल मात्र या सिटीचे वैशिट्ये म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकाची हि टाऊनशिप नसून पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी मिळून हि सिटी बांधली आहे. मात्र या निर्मितीमागे सतीश मगर यांचे संस्थापक म्हणून नक्कीच नाव घेता येईल.
👉 सतीश मगर हे एका शेतकरी जमीनदार घराण्यातुन आले आहेत. अत्यंत साधेपणा हा त्यांचा महत्वाचा गुणधर्म आहे.
👉 शालेय शिक्षण पूर्ण झाल्यांनतर सतीश मगर यांनी कृषी महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यांची पदवी पूर्ण झाल्यानंतर ते शेतीकडे वळले.
👉 त्याच कालावधीमध्ये मगरपट्टा परिसरातील शेतकरी आपल्या जमिनी बिल्डरला विकत होते त्यातून आलेल्या पैशातून उधळपट्टी करून शेवटी कंगालीच्या वाटेवर यायचे.
👉 काहीतरी वेगळे केले पाहिजे हा त्यांच्यामध्ये विचार होता. त्यांना अगोदर वाटले कि आपण आपल्या जमिनीवर बंगले बांधून विकावेत पण त्यांना ते व्यावसायिक वाटले नाही.
👉 काही वर्ष शेती केली असल्याने त्यांचे परिसरातील सर्व शेतकऱ्यांशी संबध होते. सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन एक कंपनी स्थापून ज्यांची जेवढी शेती त्या प्रमाणात त्यांना कंपनीमध्ये भागीदारी देण्याचा त्यांचा विचार त्यांनी मांडला.
👉 या विचाराला बऱ्याच शेतकऱ्यांनी सहमती दिली. तसा या गोष्टीला विरोध हि करण्यात आला. पण सर्वांना व्यवस्थित समजावून भविष्यातील फायदे दाखवून देऊन तयार केले व मगरपट्टा टाऊनशिपची पायाभरणी सुरु झाली.
👉 सर्व प्लॅन काढून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी त्यांना विचारले कि आपण टाऊनशिप उभी करण्याबाबत गंभीर आहात का? हो म्हटल्यावर त्यांनी शहरी जमीन कमाल मर्यादा कायद्याबाबत विचारले व उत्तर दिल्यानंतर त्यांनी फाईलवर साइन केली व पुढे पाठवली.
👉 2000 साली मगरपट्टा टाऊनशिपच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. पहिल्यांदा त्यांनी आय टी पार्क बांधणे सुरु केले त्यावेळी आयटी पार्क हा एक आकर्षणाचा मुद्दा होता.
👉 सुमारे 430 एकर मध्ये हि टाऊनशिप आहे. यामधील सायबरसिटी पूर्णपणे कंपनीच्या मालकीची आहे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग मगरपट्टा सिटीच्या देखरेखीसाठी खर्च केला जातो.
👉 यासोबतच अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी उद्योगासाठी प्रेरणा दिली. यातून अनेकजण आज उद्योजक झाले आहेत.
👉 सतीश मगर यांनी स्वतः पुरता विचार न करता सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा विचार केला व देशातील एक सुंदर शहर वसवले. यासोबतच त्या शहरातील 30 टक्के मालकी कायमस्वरूपी शेतकऱ्यांना देऊन अनेक पिढयांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला.