👉 आता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. परंतु वेळापत्रकासह बोर्डाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम देखील जारी केले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...
1) परीक्षा सुरु होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकांचे दहा मिनिट आधी वाटप करण्यात येते, विद्यार्थ्यांना तोपर्यंत वर्गात प्रवेश दिला जातो. पण आता परीक्षेची वेळ सुरु झाली की, विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही. जर विद्यार्थ्याला परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाला तर विद्यार्थ्यांला खोलीत प्रवेश मिळणार नाही.
अपवादात्मक परिस्थितीत आणि सशक्त कारणासह विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची कारणांसह नोंद करुन ठेवा, असे निर्देश बोर्डाने पर्यवेक्षकांना दिले आहेत.
असं का? :
गेल्यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र गाजल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठी, योग्य ती पावले उचलण्यास बोर्डाने सुरुवात केली आहे. त्यानुसार परीक्षेसाठी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.
2) परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीतच बसून रहावे लागणार आहे.
असं का? :
झटपट परीक्षा देऊन पळ काढणाऱ्या आणि परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
3) विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान केवळ वॉशरुम वापरण्याची परवानगी आहे. विद्यार्थ्यांना टॉयलेट ब्रेक घेता येईल, मात्र त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल.
असं का?:
कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान शिक्षकांनी या नव्या नियमांचे स्वागत केले आहे. काही विद्यार्थी अतिरिक्त वेळ गैरप्रकार करतात, या नियमांमुळे त्याला आळा बसेल, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. परंतु वेळापत्रकासह बोर्डाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम देखील जारी केले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...
1) परीक्षा सुरु होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकांचे दहा मिनिट आधी वाटप करण्यात येते, विद्यार्थ्यांना तोपर्यंत वर्गात प्रवेश दिला जातो. पण आता परीक्षेची वेळ सुरु झाली की, विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही. जर विद्यार्थ्याला परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाला तर विद्यार्थ्यांला खोलीत प्रवेश मिळणार नाही.
अपवादात्मक परिस्थितीत आणि सशक्त कारणासह विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची कारणांसह नोंद करुन ठेवा, असे निर्देश बोर्डाने पर्यवेक्षकांना दिले आहेत.
असं का? :
गेल्यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र गाजल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठी, योग्य ती पावले उचलण्यास बोर्डाने सुरुवात केली आहे. त्यानुसार परीक्षेसाठी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.
2) परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीतच बसून रहावे लागणार आहे.
असं का? :
झटपट परीक्षा देऊन पळ काढणाऱ्या आणि परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
3) विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान केवळ वॉशरुम वापरण्याची परवानगी आहे. विद्यार्थ्यांना टॉयलेट ब्रेक घेता येईल, मात्र त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल.
असं का?:
कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान शिक्षकांनी या नव्या नियमांचे स्वागत केले आहे. काही विद्यार्थी अतिरिक्त वेळ गैरप्रकार करतात, या नियमांमुळे त्याला आळा बसेल, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें